
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतनच्या दहावीच्या सी.बी.एस.ई. च्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
९० टक्केच्या वर गुण मिळवणारे १५ विद्यार्थी….


चिखली शहरातील तसेच पंचक्रोशीतील नावाजलेली अग्रगण्य दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेचा दहावी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या निकालात उज्ज्वल यश संपादन केले आहे. सी.बी.एस.ई. द्वारे घेतलेल्या परीक्षेमध्ये शाळेच्या एकूण ७६
विद्यार्थांनी परीक्षा दिली होती यात शाळेचे विद्यार्थी उत्तम रीतीने उत्तीर्ण झाले असून यामधून विद्यालयातून अनिकेत मोहन भराड हा विद्यार्थी ९६.४० टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. तसेच ९५.८० टक्के गुण घेऊन राहुल राजेंद्र कतोरे यांनी विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर ९५.२० टक्के घेऊन सिद्धी बालाजी जितकर ही विद्यार्थिनी विद्यालयातून तृतीय आली आहे. विद्यालयातून ९० टक्केच्या वर गुण मिळवणारे १५ विद्यार्थी असून अनिकेत मोहन भराड ९६.४०%, राहुल राजेंद्र कतोरे ९५.८०%, सिद्धी बालाजी जितकर ९५.२०%, स्वरा अमोल खेकाळे ९५.००%, गौरव पुरुषोत्तम इंगळे ९५.००%, आदित्य प्रल्हाद बहुले ९४.८०%, पार्थ राजू वायाळ ९४.२०%, कल्याणी संदीप घोडके ९३.६०%, भक्ती बद्रीप्रसाद औटी ९३.२०%, धनश्री गजानन सूर्यवंशी ९२.००%, प्रज्योत प्रशांत वायाळ ९२.००%, अभय सुनील पानगोळे ९१.४०%, रघुवीर आनंद सकळकळे ९१.२०%, कल्याणी रोहिदास जाधव ९०.४०%, तेजस नंदकिशोर कंकाळ ९०.२०% यांनी यश प्राप्त केले आहे.

सी.बी.एस.ई. द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत शाळेचे एकूण ७६ विद्यार्थी बसले होते, यापैकी १५ विद्यार्थी म्हणजेच १९.८०% विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून उज्वल यश प्राप्त केले आहे. यापैकी ४४ विद्यार्थी म्हणजेच ५७.८९% विद्यार्थी ८०% पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५७ विद्यार्थी म्हणजेच ७५% विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या पैकी ७२ विद्यार्थी म्हणजेच ९४.८०% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश गुप्त उपाध्यक्ष श्री.मनोहर खडके, सचिव डॉ.आशुतोष गुप्ता, सहसचिव श्री. पुरुषोत्तम दिवटे, शाळेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सौ. पूजा गुप्ता, शाळेचे प्राचार्य श्री.गौरव शेटे सर तसेच सर्व संचालक मंडळाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे, पालकांचे व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले आहे.

अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेत तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन कला, क्रीडा, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण, सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रातील कार्यक्रम, उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याकडे विशेष लक्ष देते हे या ठिकाणी उल्लेखनीय असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शाळा सातत्याने कटिबद्ध असते. परिसरातील नागरिकांकडून शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










