
भीषण अपघातात दोन बालकांचा जागीच मृत्यू…
जमावाने पेटवला टिप्पर..
भीषण अपघातात दोन बालकांचा जागीच मृत्यू…
जमावाने पेटवला टिप्पर..

आजी आजोबा देखत दोन्ही नातवांचा मृत्यू शेगाव जवळ घडला भयंकर अपघात संतप्त जमावाने टिप्पर पेटविला….
बुलढाणा – जिल्ह्यात दुचाकी चार चाकी आणि मग अवैध रेती, गिट्टी ,विटा याची वाहतूक करणाऱ्या डंपर ट्रक ,ट्रॅक्टर मुळे दिवसन दिवस जिल्ह्यात अपघाताचे सत्र वाढतच असताना आज तर एकच कहर झाला. आजी आजोबा च्या देखत दोन्ही नातवांचा मृत्यू आणि त्यानंतर संताप्त जमावणे डंपर पेटवून दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटना आज शेगाव जवळ घडली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील पळशी सुपो येथून शेगाकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भडगाव जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वरील दोन चिमुकल्यांचा जागी मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघातानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर जमलेल्या जमावाने रस्त्यावर उतरत डंपरला पेटवून दिले.

एकीकडे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे. आणि चिमुकले आपल्या आजी-आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्याकरता जात असताना हा भीषण अपघात घडला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजी आजोबांकडे निघालेला पार्थ चोपडे वय वर्ष 6 व युवराज भागवत वय 5 असे अपघातात मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांचे नावे आहेत. दरम्यान सदर घटना आज दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान दुपारी जळगाव जामोद तालुक्यात पशी सुपर येथून प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे पती-पत्नी आपल्या दोन नातवणांना घेऊन शेगावकडे निघाले होते.
मात्र वाटे मध्येच या चिमुकल्यांच्या नशिबात काय लिहून ठेवले आहे हे त्या आजी आजोबांना माहित नसेल. एक भरधाव टिप्परने या दुचाकी ला इतका भयंकर टक्कर दिली की ज्यामध्ये पार्थ आणि युवराज हे मृत पावले.
सदर घटना झाल्यानंतर संतप्त जमावाचा राग अनावर झाला. आणि त्यांनी अपघात करणाऱ्या या टिप्परला अक्षरशा पेटवून दिले .परिस्थिती नियंत्रण आणण्याकरता पोलीस प्रशासन हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला.
मात्र दिवसन दिवस वाढत चाललेले हे अपघात अजून कोणाच्या आशीर्वादाने आणि प्रशासन यावर काय योग्य ते पावले उचलत नाही हे वारंवार नागरिकांकडून विचारला जात आहे .आता तर या चिमुकल्यांच्या जीवाची देखील परवा केली जात नाही असेच म्हणावं लागेल.
संतप्त जमावा झाला उग्र….
सदर घटनेचे भीषणता पाहता परिसरातील जमावणे घटनास्थळी एकच गर्दी करत टेम्परला आग लावून दिली यानंतर जखमींना उपचार साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळतात जळगाव जामोद पोलीस खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत यानंतर आज विजवत जमावाला देखील पांगवले.
नेमका कसा झाला अपघात..
अमरावती येथील पार्थ चोपडे वय वर्ष सहा व बडनेरा येथील राहणारा युवराज मोहन भागवत वय वर्ष सहा हे दोघेही आजी आजोबांसोबत मोटर सायकलने शेगावकडे निघाले होते दरम्यान माऊली फाटा येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने मोटरसायकलला मागून जोरदार धडक देत चिरडले. धडक जोरदार असल्याने मोटरसायकल वरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले या अपघातामध्ये दोन्ही नातवंडांचा जागीच आजी आजोबांच्या डोळ्यादेखत दुर्दैवी मृत्यू झाला तर आजी आणि आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.